Imtiyaz Jaleel: औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचं उपोषण
  • last year
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादला धारशिव, असं ओळखलं जाणार आहे. या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे.
Recommended