हिंमत असेल तर औरंगाबादचं 'संभाजीनगर' नामकरण करून दाखवा; Sanjay Raut यांचं आव्हान
  • last year
उस्मानाबाद (Osmanabad) शहराचे धाराशीव (Dharashiv) नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद (Aurangabad) शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीका केली आहे. भाजपाचे लोक ढोंगी आहेत. त्यांनी अलाहाबादचे नामांतर केलं. मात्र, औरंगाबादचं नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

#SanjayRaut #Aurangabad #Shivsena #BJP #PMModi #ModiSarkar #CentralGovernment #Dharashiv #Osmanabad #Sambhajinagar #EknathShinde #DevendraFadnavis #Politics #Alahabad #Maharashtra
Recommended