Kabir Jayanti 2022: महान कवी Kabir Das यांनी मांडलेली प्रेरक तथ्ये, जाणून घ्या
  • 2 years ago
कबीरदास यांच्या उपदेशाने त्यांनी समस्त मानवजातीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. कबीरदास यांनी समाजात पसरलेल्या वाईट चालिरीतींवर आपल्या उपदेशांमधुन कडाडुन विरोध केला.संत कबीरांचे उपदेश प्रत्येकाच्या मनात नव्या उर्जेचा संचार करतात. कबीर मुस्लिम कुटूंबात रहात होते, तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे हे विज्ञानवादी आणि बुद्ध धम्माचा प्रभाव असणारे आहेत. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात.
Recommended