"निवडणूक आता अटळ, BJP तिसरी जागा 100 टक्के जिंकेल”, Chandrakant Patil यांचा विश्वास| Rajya Sabha Election| NCP| Sharad Pawar
  • 2 years ago
राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आज सकाळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांना यासंदर्भातले प्रस्ताव दिले होते. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, तोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रस्ताव स्वीकारल्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक होणार असल्याचं निश्चित झालं आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

#RajyaSabhaElection #ChandrakantPatil #SambhajiRaje #BJPShivSena #DevendraFadnavis #SanjayRaut #Maharashtra #SharadPawar #HWNews
Recommended