अमरावतीकरांना गायिका वैशाली माडेने केलं शांतता राखण्याचं आवाहन
  • 2 years ago
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. अमरावती शहरातील दुकानांची तोडफोड आणि काही दुकानदारांना मारहाण देखील करण्यात आली. शहरातील हिंसाचारानंतर अमरावती शहरात ४ दिवसांसाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. अमरावतीकरांना कलाकारांनी भावनिक साद घालत आवाहन केलं आहे. गायिका वैशाली माडेने अमरावतीतील नागरिकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

#vaishalimadhe #amravati #violence #tripura
Recommended