केंद्रातील मंत्र्यांनी भालेराव यांच्या कविता ऐकाव्यात; वर्षा गायकवाड यांची टीका | Pune | Sakal |
  • 3 years ago
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने यावरून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या मंत्र्यांना लक्ष केले. शेतकर्यांची नाळ मातिशी कशी जोडलेली असते हे कळण्यासाठी केंद्रातील काही मंत्र्यांनी इंद्रजित भालेराव यांच्या कविता ऐकल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना परिस्थितीची जाणीव होईल, अशी टीका गायकवाड यांनी केली. बालभारतीचा ५४ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजन कार्यक्रमात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव, बालभारती नियंत्रक विवेक गोसावी, माजी आमदार उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित होते. भालेराव यांनी 'बाप', 'गावाकडे चल माझ्या दोस्ता' अशा कविता सादर करताना शेतकर्यांची स्थिती सांगितली. हाच धागा पकडून वर्षा गायकवाड यांनी टीका केली.
"इंद्रजीत भालेराव यांचे भाषण केंद्रातील लोकांनी ऐकायला हवे होते. शेतकरी, माय, बाप यांची नाळ मातिशी कशी जोडली गेली आहे हे कवितेतून सांगितले. आपले शेतकरी रस्त्यावर येऊन अांदोलन करत आहेत, अशा स्थितीत शेतकर्यांची काय स्थिती कशी आहे हे सरकारला कळायला पाहिजे, असे गायकवाड म्हणाल्या.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended